-
‘छंदाक्षरी’ – काव्यलेखन प्रवासातील योग्य दिशादर्शक!
“एक विद्यार्थी म्हणून अभ्यास चालू आहे.” आश्चर्य वाटतं, जेव्हा राष्ट्रीय पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेले जेष्ठ गजलकार, अब्दुलरहमान करीमभाई शेख उर्फ ए. के. शेख सर असं म्हणतात; ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांना काव्यलेखनात, मुख्यत्वे करून गझल लेखनात मार्गदर्शन केलेलं आहे. २० पेक्षा जास्त पुस्तकं लिहून सुद्धा सर स्वतःला ‘विद्यार्थी’ समजतात तर हा काव्यमहासागर नक्की किती खोल असेल याचा…
-
१० आत्मचरित्रं – स्त्रियांचं भावविश्व उलगडणारी!
आत्मचरित्र हा माझा आवडता साहित्यप्रकार. एखाद्या उत्तम आत्मचरित्रातून वाचकांना कितीतरी गोष्टी घेता येतात. लेखकाचा प्रवास, त्यांचे विचार, त्यांची दैनंदिनी, एखाद्या कृतीमागची प्रेरणा, त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे किंवा महत्वाचे प्रसंग, घडामोडी, त्यामागची कारणे आणि यातून त्यांची जडणघडण कशी झाली याचा उलगडा होतो. त्यांच्या जडणघडणीत प्रभावी ठरलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्वही त्यातून उलगडत असते. अनेक घटनांमधून काळाची, मनाची, स्वभावाची…
-
‘कहाणी शब्दांची’ – प्रत्येक मराठी घरात असायलाच हवा असा शब्दकोश
काही दिवसांपूर्वी एका उपाहारगृहावरील नावाच्या पाटीवर ‘एकविरा उपकार गूह’ असं लिहिलेलं दिसलं. सहज म्हणून त्यांना सांगावंसं वाटलं की, ते चुकीचं लिहिलं आहे. तर त्यांनी सांगितलं की, ‘ते चुकून झालंय. दुसरी पाटी आहे.’ मी हुश्श! करत दुसरी पाटी पहिली, तर त्यावर लिहिलेलं ‘एकविरा उपहारगृह’. ते ‘उपहार’ नाही ‘उपाहारगृह’ असतं एवढंच सांगून मी निघाले. पण ते एकच…
-
अमृताची पालखी – मराठी भाषेतील पहिला दिवान – गझल संग्रह
दिवान म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचं उत्तर अगदी सुरुवातीलाच गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या शब्दांत सांगायचं तर ते असं, उर्दू ग़ज़लच्या चारशे वर्षाच्या काळात हजारो गज़ल संग्रह प्रकाशित झाले. त्यांनाही दिवानच म्हटलं जातं. काही शायरांनी मात्र उर्दू मुळाक्षरं नजरेपुढे ठेवून त्यातले प्रत्येक अक्षर ‘अलिफ’ पासून ‘ये’ पर्यंत काफिया व रदीफच्या स्वरुपात घेऊन त्यावर गजल रचना केल्या.…
-
बालमनावर चांगले संस्कार करणारी – ‘श्यामची आई’
आता नाव आठवत नाहीये, पण मी शाळेत असताना एकदा पेपरमध्ये बातमी वाचलेली की, कोणीतरी एक वृद्ध गृहस्थ शाळा-शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ पुस्तकाचे मोफत वाटप करत आहेत. मुलांमध्ये मूल्यसंस्कार रुजावेत म्हणून. असे उपक्रम इतरही अनेकजण आजही नक्कीच करत असतील. इतकं भारी वाटलेलं ती बातमी वाचून. तेव्हापासून आम्ही देखील सर्वांना वाढदिवसाला किंवा सणानिमित्त ‘श्यामची…
-
पुलंच्या ‘गाठोड्यात’ नक्की आहे तरी काय!
पुलंचं ‘गाठोडं’ हे पुस्तक वाचलंय? नसेल वाचलं तर एकदातरी नक्की वाचा असं मी सुरुवातीलाच सांगेन. पुस्तकातील ‘पुलं’नी सर्वांगाने मांडलेले विचार, त्यांचा हजरजबाबीपणा, भाषणाचा ओघ, भाषेवरील प्रभुत्व आणि त्यांची निरीक्षण शक्ती विस्मयचकित करणारी आहे. साहित्यासोबतच आयुष्यातील विविध विषयांवर पुलंनी त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अगदी मार्मिक भाषेत लिहिलेल्या लेखांचं, पत्रांचं आणि काही भाषणांचं, ‘भाऊ मराठे’ यांनी केलेलं संकलन…
-
सगळं उलथवून टाकणाऱ्या कविता!
भांडी इकू नगस राहू नगस उपाशी अनवाणी चालू नगस लुगड्याला ठिगळ लावू नगस असं म्हणायचास लहानपणी अन मंग आता शाली, नारळ, स्मृतिचिन्ह जी येतात घरात पेपरात असतो, टिव्हीत दिसतो कधीमधी मला सांग शिक्षण जर घेतलं नसतं तर… हे झालं असतं का रे? अडाणी कुठला कवी देवा झिंजाड यांच्या ‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ या पुस्तकातील ही…
Got any book recommendations?